जगातल्या अनेक आंतरराष्ट्रीय सीमा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असतात, पण आपल्या भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या सीमारेषेची गोष्ट थोडी वेगळी आहे. सद्याच्या नकाशामध्ये ही सीमा दिसायला खूप किचकट वाटते, पण आजपासून ६ वर्षांपूर्वी ती इतकी किचकट आणि विचित्र होती की तिला बघून तुमचं डोकं चक्रावून जाईल हे नक्की.
ही सीमा दोन्ही देशात असणाऱ्या असंख्य Enclaves मुळे प्रचंड गुंतागुंतीची झाली आहे. या Enclavesना आपण 'परिक्षेत्र' म्हणू शकतो. Enclave म्हणजे एखाद्या देशाची अशी भूमी जी चारी बाजुंनी पूर्णपणे परकीय देशाच्या भूमीने वेढलेली असते. इथले रहिवासी हे सभोवतालच्या परिसरापासून सांस्कृतिक किंवा वांशिकदृष्ट्र्या वेगळे असतात. बांग्लादेशमध्ये असे १०२ भारतीय Enclaves होते, तर भारतात बांगलादेशचे ७१ Enclaves होते!











