भारतातल्या इंग्रजी सत्तेच्या खुणा अजूनही पुसल्या गेलेल्या नाहीत, खास करून मुंबईमधून. जसं मुंबईचं बॉम्बे झालं, बांद्राचे बँड्रा आणि मुंबईमध्ये असूनही फक्त राणीच्या सत्तेमुळं स्टेशनचं नाव विक्टोरिया टर्मिनस. आता विक्टोरिया टर्मिनसचं छत्रपती शिवाजी टर्मिनस झालं असलं तरी अजूनही काही स्थानकांची नावं ब्रिटीश काळाची साक्ष देतात. कोणती म्हणून काय विचारता ? रे रोड, करी रोड, कॉटन ग्रीन, एल्फिन्स्टन रोड, चर्नी रोड...आणि हो, आपला सॅंडहर्स्ट रोड.. नाही का?
तर आता या इंग्रज प्रभावाला मिटवण्यासाठी शिवसेनेनं ८ लोकल स्थानकांची नवी नांवं गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवली आहेत. सध्या फक्त एलफिस्टन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यास गृहमंत्रालयानं मंजुरी दिलीय.राहिलेल्या स्थानकांची नांवंही लवकरच बदलण्यात येतील.
चला तर बघूया कोणकोणत्या स्टेशनचं नाव बदललंय आहे आणि त्यांचे नवं नांव काय आहे ते...

१. एलफिस्टन रोडचं नांव आहे आता प्रभादेवी!

२. मुंबई सेन्ट्रलचं नाना शंकरशेठ!

३. चर्नी रोडचं नवं नांव असेल गिरगांव!

४. करी रोडचं लालबाग !

५. ग्रँट रोडचं गावदेवी!

६. कॉटनग्रीनचं नवं नांव असेल काळा चौकी!

७. रे रोडचं घोडपदेव!

८. सँडहर्स्ट रोडचं नांव असेल डोंगरी!
पण मंडळी, नावं बदलून या स्टेशन्सची परिस्थिती सुधारणार आहे का हा प्रश्न जरा जास्त महत्त्वाचा आहे असं वाटत नाही का ? मुख्य गोष्टी करण्यापेक्षा नुसतं नामांतरात धन्यता मानण्यात काही अर्थ नाहीय. मराठीकरण करण्यापेक्षा इंग्रजांनी जे त्या काळी केलं, त्यात आजच्या गरजांनुसार सुधारणा करणं महत्त्वाचं.... नामांतराचा इव्हेंट साजरा करून परिस्थिती आहे तशीच राहिली तर नामांतराची गरजच काय ?
तुम्हाला काय वाटतं... आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा!






