बऱ्याच सिनेमात “आज है तो कल नही” हा डायलॉग तुम्ही आम्ही ऐकलाय. मित्रानो, ज्या गतीने हे जग बदलते आहे ते बघून हा डायलॉग काहीच दिवसात बऱ्याचशा उद्योगांना ‘आज है तो कल नही’ करून टाकणार आहे.
टेक्नोलॉजीची पहिली झळ पोहोचली १९९८ साली कोडॅक कंपनीला. या कंपनीत तेव्हा २ लाख लोक नोकरी करत होते आणि जगातला ८५% फोटोग्राफीचा पेपर ही कंपनी पुरवत होती. पण थोड्याच दिवसात डिजिटल कॅमेरा आला आणि पुढच्या काही वर्षात कोडॅकला टाळं लागलं.












