१९९८ साली सल्लू भाईजानने काळविटाची शिकार केली. आज जोधपुर न्यायालयात याच खटल्याचा निकाल लागला आणि आपला लाडका भाई दोषी ठरला आहे. मंडळी, सलमानने काळविटाची शिकार केल्यानंतर त्याच्या विरोधात ज्या समाजाने आवाज उठवला तो समाज म्हणजे बिश्नोई. सलमानला न्यायालयात खेचून दोषी ठरवण्याचं श्रेय बिश्नोई समाजालाच जातं.
बिश्नोई समाज पर्यावरणाशी व वन्यजीवनाशी घट्ट जोडला गेला आहे. सलमानने ज्या गावात काळविटाची शिकार केली ते गाव बिश्नोई समाजाचं होतं. वन्यप्राणी आणि पर्यावरणावर प्रेम असलेले हे लोक काळविटाच्या शिकारीवर गप्प बसले नाहीत. आज २० वर्षानंतरही हा लढा सुरूच आहे.
मंडळी, आज आपण याच बिश्नोई समाजाबद्दल जाणून घेणार आहोत. इतर समाजापेक्षा हा समाज वेगळा का आहे हे जाणून घेऊया खालील ६ मुद्द्यांच्या आधारे...













