गेल्या काही वर्षांतल्या नैसर्गिक दुर्घटना पाहाता जगभरात पर्यावरण आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे. भारतातदेखील स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागली आहे. याचे एक अभिमानास्पद उदाहरण समोर येत आहे.
इको फ्रेंडली, स्वच्छता आणि आंतरराष्ट्रीय प्रमानकांवर आधारित पर्यटन सुविधांनी युक्त अशा समुद्रकिनाऱ्यांची यादी केली जाते. या यादीत भारतातील ८ समुद्रकिनाऱ्यांनी जागा पटकावली आहे. या संकल्पनेला 'ब्ल्यू फ्लॅग बीच' असे म्हटले जाते.
















