गेले ४-५ दिवस देशातील महत्त्वाच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते वादळाने धुमाकूळ घातला आहे. केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या पाच राज्यांच्या किनारपट्टीवर वादळ आणि पावसाने थैमान घातले होते. तौक्तेने जाता जाता पश्चिम किनारपट्टीचं प्रचंड नुकसान केलं.
Garbage returned by sea in Mumbai is so Karma coming back to you pic.twitter.com/ANtIHEiqpC
— Delhi is Dying | RTing Covid info (@rohitky77) May 20, 2021
पण मुंबईला मात्र एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तशी ही समस्या पहिल्यांदा उदभवली आहे असेही नाही. दरवर्षी वादळानंतर ही समस्या उभी राहते. यावर्षीही तौक्ते वादळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईसमोर कचऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. वादळ शमल्यानंतर मुंबईच्या किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीगच्या ढीग आढळून आले. समुद्रात टाकलेला कचरा समुद्रराजाने मुंबईकरांना व्याजासकट परत केलाय.
Nature is so swift in paying back.#TauktaeCyclone has again reminded us as evident from these heaps of waste in Kochi Kerala.
— Mohan Chandra Pargaien IFS मोहन चंद्र परगाईं (@pargaien) May 19, 2021
Let's INTROSPECT#ClimateCrisis #GlobalWarming #nature撮影会 @fridays_india @ClimateReality @GlobalGoalsUN @Clim8Conscious @ErikSolheim @HuffPostGreen pic.twitter.com/1I0VFD3XyJ
मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जमा झालेले कचऱ्याचे फोटो बघितले तर समुद्रात किती कचरा जमा होत असते याची जाणीव होते. महापालिका कर्मचाऱ्यांनी ६ किनाऱ्यांवरून तब्बल ६२ हजार किलो कचरा गोळा केला आहे.
“Hello! Here’s the full refund on your garbage.”
— Litisha Mangat (@litisha_mangat) May 18, 2021
- Mother Nature.
Mumbai, Cyclone Tauktae pic.twitter.com/r8kNuIT1VS
सोशल मिडीयावर देखील या गोष्टीची चर्चा झाली. अनेकांनी अनोख्या पद्धतीने यावर आपले मत व्यक्त केले. तरी देखील एक प्रश्न उरतोच, की दरवाजा आपण समुद्राकडून परत केला जाणाऱ्या कचऱ्याबद्दल बोलत राहू. पण हा कचरा टाकणे कधी बंद होणार आहे?
समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही म्हणतात ना तेच खरे.






